Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

महाराष्ट्रातील ‘या’ पाच जिल्ह्यांनी दिला सुखद धक्का; करोना संसर्गाबाबत सर्वात मोठी अपडेट

पुणेः पुण्यासह मुंबई, ठाणे, नागूपर आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये चालू आठवड्यात ‘ओमायक्रॉन’च्या संसर्गाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत १८ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली आहे.

राज्यात ११ ते १७ जुलै दरम्यान आढळलेल्या रुग्णसंख्येचे आरोग्य विभागाने विश्लेषण केले आहे. राज्यात आतापर्यंत पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संक्रमणाचे प्रमाणही वाढले होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णांच्या संख्येत १८ टक्के घट झाली आहे. चालू आठवड्यात ठाणे जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात सातारा जिल्ह्यामध्ये मृत्यूचे २.११ टक्के आहे. पुणे, सातारा, मुंबईपाठोपाठ बाधित रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ठाण्याचा क्रमांक लागतो.

वाचाः

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button