breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोकणात जाण्यासाठी आता ई-पासची गरज नसली, तरी ‘हे’ असणार आहेत नियम-अटी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आता ई पासची गरज नसल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. आता तसेच चाकरमान्यांसाठी क्वारंटाइनचा कालावधी जो 14 दिनवसांचा केला होता तो आता 10 दिवसांचा करण्यात आला आहे. तर 7 हजार गाड्यांचे नियोजन करण्यात आलंय…
तसेच बुकिंग प्रमाणे गाड्या सोडल्या जाणार असून आजपासून म्हणजे 4 ऑगस्टपासून संध्याकाळी ६ वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. मात्र या प्रवासासाठी का नियम आमि अटी असणार आहेत ते पाहुया.
नियम
- एस टी मध्ये २२ लोकांना प्रवास करता येईल. मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील मध्ये कुठेही थांबणार नाहीत. जेवण स्वत:चं जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एस टी थांबणार नाही. फक्तं 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबणार आहे.
- खासगी बस चालकांना एस. टी. पेक्षा दीड पटच दर आकारता येणार आहे. नाहीतर कारवाई करण्यात येईल.
- कोकणवासीयांना १२ ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. १२ तारखेला रात्री १२ पर्यंत पोहचतील त्यांना होम क्वारंटाइन होणे गरजेचे असणार आहे.
- ज्यांना १२ तारखे नंतर जायचे असेल त्यांना ४८ तास आधी कोरोनाची चाचणी करावी करावी लागणार आहे आणि ती निगेटीव्ह आली तरच त्यांना कोकणात जाता येणार आहे असाही नियम करण्यात आला आहे.