breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याने अधिकाऱ्यांसह 20 जण बेपत्ता

दिसपूर । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।
आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोट बुडाल्याने 20 जण बेपत्ता झाले असून, यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आसामच्या धुबरी जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समजते.

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोट बुडाल्याने 20 जण बेपत्ता झाले असून, यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आसामच्या धुबरी जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समजते. या घटनाची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने शोध कार्य आणि बचाव कार्याला सुरूवात करण्यात आली.

आसामच्या धुबरी जिल्ह्यात असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाली. या बोटीत 50 जण प्रवास करत होते. मात्र, बोट बुडाल्याने यापैकी 20 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ही अपघातग्रस्त बोट स्वदेशी बनावटीची यांत्रिक बोट आहे.

याबाबत आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सीईओ ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी माहिती दिली आहे. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिक तपास आसाम आपत्ती व्यवस्थापन करत आहे. ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याने धुबरीचे अधिकारीही अद्याप बेपत्ता असल्याचे उपायुक्त एम. पी. अनबामुथन यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button