breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

१६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात

नवी दिल्ली | लॉकडाऊनचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांवर होताना दिसतोय. महागाई भत्त्यात होणारी वाढ केंद्र सरकारने थांबवली होती. आता आणखी एक वाईट बातमी समोर येतेय. साधारण १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ हजार रुपयांची कपात होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मिळणारा ६ वा भत्ता थांबवला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी १६ लाख कर्मचाऱ्यांना मिळणारे ६ वा भत्ता थांबवला. सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. युपीचे अप मुख्य सचिव संजीव मित्तल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. ही वेतन कपात झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ हजार कमी येणार आहेत.

कोरोनामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नात घट झाली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निधीची गरज लागणार आहे. हे पाहता सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

सचिवालय भत्ता – १० हजारहून अधिक कर्मचा्यांना किमान ६२५ रुपये आणि जास्तीत जास्त 2000 रुपयांचा लाभ मिळतो.

शहर भरपाई भत्ता – १ लाख कर्मचाऱ्यांना किमान ३४० आणि जास्तीत जास्त ९०० रुपये मिळतो. राज्यातील प्रत्येक कनिष्ठ अभियंत्यास ४०० रुपये विशेष भत्ता मिळतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button