हेल्मेट न वापरणा-यावर खटले दाखल होणार
प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांचा इशारा
पुणे – दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट न वापरणार्या नागरिकांनी वारंवार नियमभंग केल्यास थेट खटला दाखल करण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे हेल्मेट वापरणारच नाही, असा अट्टाहास बाळगणार्यानी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा वारंवार सूचित करूनही हेल्मेट न वापरणार्यांना तीन महिन्यांच्या साध्या कैदेचा अनुभव घ्यावा लागेल, असे सांगतानाच स्वसंरक्षणासाठी हेल्मेट आवश्यकच असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिला आहे.
रस्ता सुरक्षा समितीच्या वार्षिक अहवाल सादरीकरण व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत, मुख्य सचिवांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट न वापरणार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यासंदर्भात दोन्ही विभागांकडून वारंवार बैैठका घेऊन कारवाई संदर्भात आराखडा तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दुचाकी वाहन चालविणार्यासहित मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक आहे. कारवाई दरम्यान वारंवार सूचित करूनही हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वाराचे लायसेन्स तीन महिन्यांची निलंबित केले जाणार आहे.