“हिरोईनने केवळ मुंबईत थांबावं आणि…”; दीपिकाबद्दल भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
भारतीय जनता पार्टीचे नेते गोपाल भार्गव यांनी बुधवारी दीपिका पादुकोणबद्दल एका वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. दीपिका काही दिवसांपूर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापिठातील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेलेली होती. याचसंदर्भात तिच्यावर टीका करताना भार्गव यांनी “अभिनेत्रीने मुंबईतच रहावे आणि नाचावे,” असं वक्तव्य केलेलं आहे.
“मुंबईमध्ये थांबून अभिनेत्रीने केवळ नाच केला पाहिले. तिला जेएनयूनमध्ये जाण्याची काय गरज होती मला कळलेलं नाही. स्वत:ला कलाकार आणि कार्यकर्ते म्हणवतात असे डझनभर लोकं हल्ली तयार झाली आहेत,” असं मत भार्गव यांनी व्यक्त केलं. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. भार्गव हे मध्य प्रदेश विधानसभेमध्ये विरोधीपक्ष नेते आहेत. दीपिकावर टीका करतानाच भार्गव यांनी जेएनयूमधील माजी विद्यार्थी अध्यक्ष असणाऱ्या कन्हैया कुमार यांच्यावरही टीका केली आहे. “कन्हैयासारख्यांनी तर निवडणूकही लढली. बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढून तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला,” असा टोला भार्गव यांनी लगावलेला आहे.