breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांडाविरोधात हे मंत्री बसले उपोषणाला

वर्धा | महाईन्यूज | ऑनलाईन टिम

हिंगणघाट येथे घडलेल्या जळीतकांडांतील 24 वर्षीय प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर आज वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदारी यांनी या घटनेच्या निषेधार्थ आत्मचिंतन आणि सामूहिक उपोषण सुरु केलं आहे. उपोषणात अनेक विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला आहे. सलग 12 तास हे उपोषण सुरु राहणार आहे

महिलांच्या सन्मानाचे चिंतन खूप झाले. त्यावर चर्चा करण्यापेक्षा ते आमलात आणण्याची गरज आहे. त्यासाठीच आपण हे उपोषण हाती घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकप्रबोधनातून क्रांती घडत असते. आत्मचिंतन करून महिलांचा सन्मान कृतीत उतरला पाहिजे. त्यातुनच अन्यायाविरोधात आपण लढा उभारू शकतो, असा विश्वास सुनील केदारी यांनी व्यक्त केला आहे.

हे उपोषण 12 तास चालणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी देशासाठी जे विचार दिले, त्या विचारांनी समाजाला ताकद दिली. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या या विचारांना उजळणी देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सुनील केदार यांनी सांगितले.

अशी घडली घटना

वर्धा जिल्ह्याच्या दारोडा गावातील एका 24 वर्षीय प्राध्यापिकेवर भरदिवसा भररस्त्यात पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. तब्बल आठ दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली. अखेर 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button