स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडीचाच विकास – राज्यमंत्री अब्दुल सत्तार
एकत्र निवडणूक लढणार असल्याचे प्रतिपादन
मुंबई | प्रतिनिधी
आगामी काळात राज्यभरात विविध ग्रामपंचायत निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी मोठे विधान केले आहे.
राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारचे राज्य सुरळीत सुरु असल्याचे दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यास मिळाले आहे. सहा पैकी चार ठिकाणी या सरकारला यश मिळाल्याने सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील एकत्र लढवण्यावरून चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात तिन्ही पक्षांमध्ये अजूनही एकमत झालेले नसून शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जे काही आदेश येतील त्यानुसार आम्ही स्थानिक पातळीवर निवडणूक लढवणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक देखील महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
…………….