breaking-newsराष्ट्रिय

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल !

  • घातक शासनापासून रक्षण करा

नवी दिल्ली: मोदी सरकार लोकशाहीशी तडजोड करणारी धोकादायक व्यवस्था असल्याचे सोनिया गांधीने म्हटले आहे. भारताच्या लोकशाहीला धोकादायक शासनापासून पासून मुक्त केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी देशातील नागरिकांना केले.

माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा झालेल्या काँग्रेस कार्यकारणी समितीला संबोधित करताना त्या म्हणाल्या, भाजप सरकारमुळे भारताच्या वंचित आणि गरीबांवर निराशा व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तृत्वामुळे सर्व हताश झाले असून त्यांची उलटी गिंती सुरु झाली असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

आम्ही आघाडीचे काम करण्यास कटिबद्ध असून या प्रयत्नांत आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत आहोत. भारताच्या लोकशाहीशी तडजोड करणाऱ्या घातक शासनापासून आपल्याला आपले रक्षण करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Congress

@INCIndia

We are committed to make alliances work and we are all with him (CP @RahulGandhi) in this endeavour.
We have to rescue our people from a dangerous regime that is compromising the democracy of India: Former Congress President Sonia Gandhi

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button