सुशांत सिंह राजपूतच्या याच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खान , करण जोहर ,संजय लीला भन्साली आणि एकता कपूर यांच्यासह 8 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत जेवढी हळहळ व्यक्त केली जात आहे तेवढच ते चिघळत चालंल आहे. सुशांतच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, बॉलिवूडच्या काही मंडळींनी त्याला बॅन केल्यामुळे सुशांतने टोकाचे पाऊल उचलले असल्याचं सध्या बोललं जात आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात असताना एक नवे अपडेट समोर येत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान , निर्माता करण जोहर , संजय लीला भन्साली आणि एकता कपूर यांच्यासह 8 जणांविरुद्ध बिहारच्या मुज्जफरपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण स्थानिक वकील सुधार कुमार ओझा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बिहार मधील मुज्जफरपूर येथील एका न्यायालयात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कलम 306, 109, 504 आणि 506 अंतर्गत करण जोहर, संजय लीला भन्साली, सलमान खान आणि एकता कपूर यांच्यासह 8 जणांविरोधात तक्रार दाखल केली असल्याचं. वकील सुधीर कुमार ओझा यांनी म्हटलं आहे…
आयपीसी कलमानुसार, एकता कपूर, संजय लीला भंसाली, करण जोहर आणि सलमान खान यांच्यासमवेत इतर काही जणांविरोधात सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल आणि त्याला वाईट वागणूक दिल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना शिक्षा व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
सुशांतला बॉयकॉट करत त्याच्याकडून 6 सिनेमे काढून घेण्यात आले होते अशी चर्चा देखील सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर रंगत आहे. दरम्यान सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा व्यावसायिक दृष्टीनेही तपास केला जाईल असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
त्यामुळे आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अजून कोणत नविन वळण घेईल हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे…