देशात गेल्या २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू
नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ९७४ ने भर पडली आहे. तर गेल्या २४ तासात २ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ६ हजार ९२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५४ हजार ०६५ वर गेला आहे. त्यापैकी एकूण १ लाख ८६ हजार ९३५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१७ जून) दिली आहे.
देशात अनलॉक झाल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत १ लाख ४६ हजार ४५० ची वाढ झाली आहे तर मृतांची संख्या ४ हजार ४१६ ने वाढली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ५२.७९ टक्के झाला आहे. राज्यात काल कोरोनाच्या २ हजार ७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल (१६जून) राज्यात १ हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १३ हजार ४४५ इतकी झाली आहे. यापैकी ५० हजार ४४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.