अक्षय, अजय, हृतिक, सोनाक्षीसह अनेक कलाकारांनी शहिदांना वाहिली आदरांजली
मुंबई | लडाखच्या गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री भारत-चीन सीमेवर मागील 42 दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावाने रक्तरंजित रूप घेतले. भारतीय हद्दीतील प्रदेशाचा ताबा घेऊन ठाण मांडून बसलेल्या चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर रात्री लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला. एएनआयच्या वृत्तानुसार त्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले, तर चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली असून कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, तमन्ना भाटिया, सोनाक्षी सिन्हा यासह अनेक कलाकारांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून जवानांना आदरांजली वाहिली आहे. ‘जरा आँख में भर लो पानी; जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी.’ या जवानांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिले. भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांना माझा सॅल्यूट, जय हिंद,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले.