breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पलटवार

पुणे – राज्य सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना नते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय. सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे आणि त्यांची सुरक्षा काढली नाही तर कमी केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. ते आज पुण्यात बोलत होते.

वाचा :-मनसे प्रमुख राज ठाकरेंची झेड सुरक्षा, देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रूफ गाडी हटवली, चंद्रकांत पाटील व प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात

सध्या औरंगाबादच्या नामांतराचाही मुद्दा चांगलाच गाजतोय. त्या पार्श्वभूमीवर नामांतराला आपलं समर्थन असल्याचंही सत्तार यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या बाबती भूमिका घेतली आहे. दोन्ही मित्रपक्षांशी चर्चा करुन यावर निर्णय घेतला जाईल असंही सत्तार म्हणाले. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांवर उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला नाही, असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button