breaking-newsमहाराष्ट्र
सरकारची दीडपट हमीभाव देण्याची घोषणा फसवी: आमदार थोरात
संगमनेर – सरकारची दीडपट हमीभाव देण्याची घोषणा फसवी ठरली आहे. हे सरकार शेतकर्यांबाबद पुर्ण उदासीन असून शेतकर्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे व सरकारने शेतकर्यांसाठी कायम मदतीची भूमिका घेतली पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
थोरात पुढे म्हणाले की, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद , पंचायत समिती व बाजार समितींची निर्मीती केली. शेतकर्यांचा माल विक्रीसाठी सुरु केलेला बाजार समितीचा निर्णय हा पुढे संपुर्ण देशात राबविण्यात आला. बाजार समिती हे शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. अत्यंत काळजीपुर्वक अशी वाटचाल आपल्या बाजार समितीची आहे. बाजार समितीतील व्यापारी चांगले असून शेतकर्यांसाठी चांगल्या सुविधा आहे. आपल्याकडे उत्पादित होणारे डाळींब हे आपल्या बाजार समितीत विकले गेले पाहिजे