breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

शिवसेना ही गुलाम झालीय – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

कोल्हापूर महाईन्यूज।  

शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गुलाम झाल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते. केंमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव सरकारच्या नव्या मंत्र्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. याच वेळी त्यांनी सात बारा कोरा करण्याचा सरकारने आपला निर्णय पूर्ण करावी अशी मागणी केली.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज झाला. गेल्या महिनाभरापासून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मिळून एकून 36 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 10 राज्यमंत्री तर एक उपमुख्यमंत्री असे 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button