वेलकम बॅक… राहुल गांधींच्या ‘Hey’ ट्विटला महाराष्ट्र भाजपाचं ‘ते’ उत्तर,
मुंबई | महाईन्यूज
मध्य प्रदेशमध्ये राजकीय भुकंप पाहायला मिळाला आहे. काँग्रेस सरकारमधील 22 आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिले. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने 19 आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. या घडामोडी घडत असताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आता, राहुल गांधींच्या या टीकेला महाराष्ट्र भाजापाने प्रत्युत्तर दिलं आहे.
पीएमओला उद्देशून राहुल यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात मोदीजी तुम्ही पेट्रोल-डिजेलच्या दरात जागतीक पातळीवर 35 टक्क्यांनी झालेली घसरण विसरून गेले आहात. आंतरराष्ट्रीय बाजारातील या दरकपातीचा फायदा भारतीयांना व्हावा. भारतात पेट्रोल-डिजेलचे दर 60 रुपयांपेक्षा कमी करून द्याल का?, असा सवाल राहुल यांनी मोदी सरकारला केला आहे. तसेच इंधनाचे दर कोसळल्याने देशातील अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असंही राहुल यांनी म्हटले होते. राहुल यांच्या ट्विटला महाराष्ट्र भाजपाने जशास तसेच उत्तर दिलंय.