breaking-newsमहाराष्ट्र

वेरुळ आणि अजिंठासह सर्व पर्यटनस्थळे बंद

19 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत शहरातील सर्व पर्यटनस्थळे बंद राहणार 

औरंगाबाद- देशात वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे औरंगाबादमधील जगविख्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्या बंद करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत वेरुळ आणि अजिंठा लेणी बंद राहणार आहेत.

कोरोनाच्या प्रभावामुळे फक्त अजिंठा आणि वेरुण लेण्यासोबतच जाजमहलची प्रतिकृती असलेला बीबी-का-मकबारा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद (देवगिरी) किल्ला, पानचक्की इत्यादी पर्यटन स्थळेही प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांगताना जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, ” पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारी सर्व पर्यटन स्थळे 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. पुढील दोन दिवसात या स्थळांवर येणाऱ्या परदेशी नागरिकांची याआधीच स्क्रीनींग झालेली असल्यामुळे त्यांना येत्या दोन दिवसात ही पर्यटन स्थळे पाहता येणार आहेत.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button