विविध भागात अडकलेल्या प्रवासी कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशात विविध भागात अडकलेल्या प्रवासी कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या येथे अडकलेल्या लोकांना त्यांच्या गृह राज्यात पाठवण्यासाठी आणि दुसऱ्या ठिकाणी अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणण्यासाठी प्रोटोकॉल निश्चित करावा..जेणेकरून अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात परत जाता येईल…
गृह मंत्रालयाच्या आदेशा प्रमाणे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या कामासाठी नोडल अधिकारी नेमतील आणि मग हे अधिकारी आपल्या इथे अडकलेल्या लोकांची नोंदणी करतील. ज्या राज्यांदरम्यान वाहतूक होणार आहे. तिथे हे अधिकारी एकमेकांशी संपर्कात राहतील. रस्ते मार्गाने या नागरिकांची ने-आण केली जाईल. तसेच जे लोक जाऊ इच्छितात त्यांची स्क्रिनिंग सुद्धा करण्यात येणार आहे… जर त्यांच्यात कोविड-१९ ची काही लक्षणे दिसली नाही तर त्यांना परवानगी दिली जाईल.
या नागरिकांची ने-आण करण्यासाठी बसचा उपयोग करता येईल. बस सॅनिटाईज केल्यानंतर यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार नागरिकांना बसवले जाईल