breaking-newsक्रिडा
विराटवरचा भार कमी करण्यासाठी रोहितला टी-२० चं कर्णधारपद देता येईल !
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर अतिक्रिकेटमुळे येणारा भार कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माला टी-२० संघाचं कर्णधारपद देता येईल, रोहितने आयपीएलमध्ये ३ वेळा मुंबई इंडियन्स संघाला विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्यामुळे रोहितच्या नावाचा विचार करण्यास काहीच हरकत नसल्याचं युवराज सिंहने म्हटलं आहे.
“काही वर्षांपूर्वी वन-डे आणि कसोटी असे दोनच प्रकार खेळवले जायचे. त्यामुळे दोन्ही संघासाठी एकच कर्णधार योग्य असायचा. मात्र आता टी-२० क्रिकेटमुळे विराट कोहलीवर जर अतिक्रिकेटमुळे भार येणार असेल, तर टी-२० क्रिकेटसाठी दुसऱ्या खेळाडूचा विचार करता येऊ शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये रोहित एक यशस्वी कर्णधार आहे.” ‘आज तक’ वाहिनीशी बोलत असताना युवराज सिंह बोलत होता.