breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
विना ई-पास आंतरजिल्हा एसटी बसने प्रवास करण आता शक्य
लॉकडाऊनमुळे प्रवासांवर निर्बंध आलेल्या राज्यातील नागरिकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे.त्यामुळे आता नागरिकांना प्रवास करण सोपं जाणार आहे.
एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. बसमधून प्रवाशांना ई पास तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी राहणार नाही. मात्र, करोनाच्या अनुषंगानं प्रशासनानं घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे प्रवाशांवर बंधनकारक असणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिऴाला आहे. त्याचप्रमाणे ई पासची सक्ती नसल्यानं प्रवाशंना येणाऱ्या प्रवासाच्या अडचणी काही प्रमाणात का होईना पण कमी होणार आहे.