विधीमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक
मुंबई – राज्याचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला होणार आहे. मात्र, राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेता सर्व नेत्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. अशातच काल (४ सप्टेंबर) विधीमंडळाचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. नाना पटोलेंसह ३५ आमदारांनी आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यांतील काही आमदार बरे होऊन घरी गेले आहेत तर काही अद्याप उपचार घेत आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच दुग्द्धविकासमंत्री सुनील केदार यांनीही कोरोनाची लागण झाली. येत्या ७ तारखेपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाला महाराष्ट्रातून सर्व आमदार मुंबईत एकत्र येणार आहेत. त्यामूळे अधिवशनात सहभागी होणाऱ्या आमदार, मंत्री या सगळ्यांची एन्टीजन कोरोना चाचणी होणार आहे. आजपासून विधीमंडळ परिसरांत एन्टीजन टेस्टचे काऊंटर लावण्यात आले आहेत. सर्व स्टाफला आज आणि उद्या ही टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्यामूळे आता हे अधिवेशन कसे होणार आणि किती जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.