breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
… लोकसभा निवडणूक जिंकली तर देशात शेवटची निवडणूक
- माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेची टीका
सोलापूर : सत्ताधारी हे राक्षस असून त्यांनी जर लोकसभा निवडणूक जिंकली तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल. कारण मोदी यांच्यात हुकूमशहा ठासून भरला आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनोमिलन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच माझे दिल्लीत ‘दुकान’ चालते, असेही कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची बैठक वडाळा येथे पार पडली. यावेळी त्यांनी मोदींच्या कारभारावर सडकून टीका केली.