breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मंत्रीमहोदय बसले खुर्चीवर अन् शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला खाली

 – शिवप्रेमींची कडाडून टीका

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी सर्वत्र साजरी केली जात आहे. मात्र या उत्साहाच्या वातावरणात एक संतापजनक घटना घडल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. शिवजयंती निमित्त आयोजीत एका कार्यक्रमात सिंधुदुर्गचे पालकमंत्री स्वत: खुर्चीवर बसले असताना शिवाजी महाराज यांचा पुतळा खाली ठेवण्यात आला. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून केसरकरांनी जाहिर माफी मागावी अशी मागणी होत आहे.

‘चांदा ते बांदा योजना अंतर्गत’ महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आयोजित एका कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. यावेळी केसरकर हे खुर्चीवर बसले असून शिवाजी महाराज यांचा पुतळा खाली ठेवण्यात आला. शिवाजी महाराजांना खाली ठेवणे हा त्यांचा अपमान असून केसरकरांनी याबाबत जाहिर माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button