breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

लॉकडाऊनमुळे डाळ, तांदूळ, तेल आणि मीठाच्या दरात वाढ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे किंवा तो वाढवलाही जाऊ शकतो. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या या लॉकडाऊनमुळे डाळ, तांदूळ, तेल आणि मीठाच्या किमती वाढल्या आहेत. तर भाजीपाल्याच्या किमतींमध्ये त्या तुलनेत घट झाली आहे. बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ ही सरकारी आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे.

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गहू, तांदूळ, डाळी, तेल, साखर आणि चहाच्या किमती वाढल्या आहेत. ही वाढ लॉकडाऊनमुळे झाली असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. ईशान्य भारतात तांदळाच्या किमतीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तर दिल्लीमध्ये हरभऱ्याच्या डाळीच्या किमतीमध्ये १४ रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. 

लॉकडाऊनची सुरुवात झाली त्यावेळी डाळ ७२ रुपये प्रतिकिलो होती. तर २८ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, डाळीची किंमत ८६ रुपयांवर पोहचली आहे. तूर डाळींच्या किमती देखील वाढल्या आहेत. मंत्रालयाच्या  किंमत देखरेख विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीत तूर डाळीची किंमत १३ रुपयांनी आणि तेलंगणामध्ये ३० रुपये प्रति किलो दराने वाढल्या आहेत. मसूर डाळीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये १० रुपये, गुरुग्राममध्ये २० रुपये आणि मुंबईमध्ये ३३ रुपये प्रति किलो दराने वाढ झाली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button