रोहित शर्माला वगळण्यावरुन सौरव गांगुली नाराज
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत यशस्वी नेतृत्व करताना रोहित शर्माने भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धेत विजय मिळवून दिला. यानंतर 4 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला संघात जागा मिळेल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र निवड समितीने यंदाही रोहितचा कसोटी क्रिकेटसाठी विचार केलेला नाही.
वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल यांना संघात जागा मिळाली असली, तरी करुण नायरला संघातून वगळल्यामुळे संघनिवड वादग्रस्च ठड़ली आहे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली व हरभजन सिंग यांनीही रोहितला वगळण्याच्या निर्णयावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे. “निवड समितीचे सदस्य नेमका काय विचार करतायत? कोणाला समजले तर मलाही सांगा’, अशा शब्दांमध्ये हरभजनने रोहितला वगळण्याच्या निर्णयावर आपले मत मांडले आहे.
दुसरीकडे सौरव गांगुलीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर रोहितला वगळण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. रोहितला 2018 जानेवारी महिन्यातील दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी संघात आपली जागा राखता आलेली नाही