breaking-newsमहाराष्ट्र

रेशन कार्ड नसलेल्यांनाही ५ किलो तांदूळ देणार – छगन भुजबळ

मुंबई :  कोरोनाचे आव्हान जगणं कठीण करत असतानाच पोटाची भूक भागवण्याचं आव्हानही समाजातील एका मोठ्या वर्गापुढे आहेत. ही सर्व परिस्थिती आणि बहुतांश नागरिकांपुढे असणारं हे आव्हान पाहता आता रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार आहे. 

कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड नसलेल्यांना राज्यात मोफत पाच पाच किलो तांदूळ  वाटण्यात येणार आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी कोणी अर्ज केला आहे, कोणाचा अर्ज प्रलंबित आहे किंवा असे केसरी कार्डधारक ज्यांना तांदूळही मिळत नव्हते अशा सर्वांची तहसीलदार पातळीवर यादी तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 

केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे आता ही सुविधा राज्यातही उपलब्ध झाली असून नागरिकांनी याबाबत प्रशासनाची संपर्क केल्यास ते मिळू शकणार असून, आता सर्व पीडित लोकांना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button