breaking-newsमहाराष्ट्र

‘रिकाम्या खुर्च्यां पाहून मोदींचा पारा चढला

मुंबई : वर्धा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवारसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

शरद पवार शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत. परंतु देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी काय केले आहे हे जगजाहीर आहे. परंतु पाच वर्षांत मोदींनी काय केले याबाबतचा जवाब द्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

भाजप हा शेतमालाचे उत्पादन करणारा नाही तर शेतमालाची लुट करणारा पक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाच वर्षात न्याय देवू शकले नाहीत. आणि आता सिंचन घोटाळयामुळे आत्महत्या होत आहेत. पाच वर्षांपूर्वी जे आरोप करत होते तेच आरोप करत आहेत. पाच वर्षात कुठले आरोप सिद्ध केले कुठले प्रकल्प पूर्ण केले. तीन वर्षात ४० हजार किंमत वाढ झाली आहे. याचं उत्तर भाजप देत नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यात गटबाजी आहे. अजितदादा पवार पक्षात कुठे तरी अस्तित्व निर्माण करत आहेत असे तुम्ही बोलत आहात. अहो आमची परंपरा वडीलधारी आणि वयस्कर लोक आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेब तर आमचे अध्यक्ष आहेत. त्यांचा आदर आमचा कार्यकर्ता ठेवतो आहे. परंतु तुमचे नेते अडवाणी यांनी तुम्हाला राजकारणात आणलं, तुम्हाला मुख्यमंत्री केलं. नेता केला त्यांची हालत तुम्ही काय केलात हे देश बघतोय असा टोलाही मोदी यांना लगावला.

आमची विकेट जाणार असं बोलत आहात परंतु सभेचे मैदान रिकामे होते याचा अर्थ जनताच तुमची विकेट घेणार आहे. इतरांकडे बोटे दाखवण्यापेक्षा आजच्या सभेचा राग तुम्हाला आला. त्यातूनच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काढला आहे. परंतु तुम्ही कितीही राग काढला तरी जनताच २३ मे रोजी तुमची विकेट घेवून देणार आहे असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button