breaking-newsमहाराष्ट्र

राष्ट्रवादीने ‘धरण फोडणारे खेकडे’ पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरीतल्या चिपळूमध्ये असलेले तिवरे धरण खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे फुटले असा जावईशोध लावणारे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झालेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आणि आनंद परांजपे यांनी खेकडे पकडून ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले. हेच ते खेकडे आहेत ज्यांनी धरण फोडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी उपरोधिक मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली. यासंदर्भातले फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी बेशरम सरकार हा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.

Dr.Jitendra Awhad

@Awhadspeaks

Replying to @Awhadspeaks

खेकडे धरण फोडून पळत होते

Embedded video

Dr.Jitendra Awhad

@Awhadspeaks

आणि ते खेकडे पकडून पोलिसांच्या हवाली केले #बेशरमसरकर

View image on Twitter
65 people are talking about this

Dr.Jitendra Awhad

@Awhadspeaks

हाच तो खेकडा ज्याने #तीवरे धरण फोडले
23 माणसे मारली …
धन्य आहे
..
..
..
स्थानिक आमदाराचा भाऊ कॉनट्रॅक्टर
..
का नाही अटक
कोण जबाबदार

खेकड्याला तरी अटक करा
..
..

आपला कुठे कोण मेला आहे तर आपण सुतक पाळायचे

कुठे गेला माझा संवेदनाशील महाराष्ट्र
..

View image on Twitter

Dr.Jitendra Awhad

@Awhadspeaks

खेकडे धरण फोडून पळत होते

Embedded video

एकीकडे २३ जणांचा बळी गेलेला असताना राज्य सरकारकडून असे अजब दावे केले जात आहेत. हे बेशरम सरकार आहे त्यांना दुसरा शब्दच नाही अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. या आंदोलनात आनंद परांजपे, सुजाता घाग, हेमंत वाणी यांनी सहभाग घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button