breaking-newsमहाराष्ट्र
राष्ट्रवादीने ‘धरण फोडणारे खेकडे’ पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरीतल्या चिपळूमध्ये असलेले तिवरे धरण खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे फुटले असा जावईशोध लावणारे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झालेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आणि आनंद परांजपे यांनी खेकडे पकडून ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले. हेच ते खेकडे आहेत ज्यांनी धरण फोडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी उपरोधिक मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली. यासंदर्भातले फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी बेशरम सरकार हा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.
एकीकडे २३ जणांचा बळी गेलेला असताना राज्य सरकारकडून असे अजब दावे केले जात आहेत. हे बेशरम सरकार आहे त्यांना दुसरा शब्दच नाही अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. या आंदोलनात आनंद परांजपे, सुजाता घाग, हेमंत वाणी यांनी सहभाग घेतला होता.