breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरे यांनी मुस्लिमांच्या नावावे ढोल बडवू नयेत – ऍड. प्रकाश आंबेडकर

मुंबई |महाईन्यूज|

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले आहे. राज ठाकरे यांच्याकडे भारतामध्ये किती पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोक आले आहेत, याचा नेमका आकडा आहे का, अन्यथा त्यांनी तथ्यहीन बोलू नये. तसेच उगाच मुसलमानांच्या नावानेही ढोल बडवू नये, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी केली.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी व केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात वंचित ने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची मदत करू नये, असे आवाहनही केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button