राज्य सहकारी बॅंकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सिध्द करुन दाखवावे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
उद्या मला ईडीची चाैकशी लावून तुरुंगात टाकले तर आश्चर्य वाटून घेवू नका – चव्हाण
कराड |महाईन्यूज |प्रतिनिधी|
राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध करूनच दाखवावे, असे आव्हान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. ते रविवारी दक्षिण कराडमध्ये बोलत होते. तसेच उद्या मला ईडीची चौकशी लावून तुरुंगात टाकले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. माझी तयारी आहे, मी घरी तसे सांगून ठेवलेय, असेही चव्हाण यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी म्हटले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटीचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, ज्या बँकेत ११ हजाराच्याच ठेवी असतील तिथे २५ हजार कोटीचा घोटाळा कसा होऊ शकतो, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो की, त्यांनी हा भ्रष्टाचार सिद्ध करूनच दाखवावा. सरकार दहशत दाखवण्याकरता कोणत्याही थराला जात आहे. चिदंबरम झाले, डी. के. शिवकुमार झाले, चंद्राबाबू झाले, शरद पवार झाले आहेत.