breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात ६ महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा’
मुंबई – राज्यात ६ महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याची गरज नाही.’, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. अन्नधान्याचा साठा आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले.
भाजीपाला मार्केट आणि बटाटा मार्केट बंद करा असे सरकारने सांगितले नाही. त्यामुळे बाजार समित्या बंद राहणार नाही. तसंच कोणतेही मार्केट सुद्धा बंद राहणार नाही. फक्त नागरिकांनी अन्नधान्य आणि भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करु नका. ग्राहकांनी स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन छगन भुजबळांनी केले आहे. तसंच, चिकन, मटण, मासे विकण्यास परवानगी आहे त्यावर बंदी नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.