breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात रिकव्हरी रेट सुधारला, मृत्यू दर घटला
मुंबई – राज्यात गेल्या 24 तासात 3 हजार 513 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 2 हजार 628 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.आजपर्यंत एकूण १९ लाख ५२ हजार १८७ रुग्णांनी कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९५. ७६ टक्के इतका झाला आहे.राज्यात रुग्णवाढीला गेल्या काही दिवसांपासून मोठा ब्रेक लागला आहे. कोरोनाबाधितांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळं रिकव्हरी रेट किंचित वाढला आहे. राज्यात आज ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा ५१ हजार २५५ इतके झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५१ टक्के इतका आहे