breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर आज १ हजार ४२७ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राज्यात रिकव्हरी रेट ९४.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, राज्यात मागील २४ तासांमध्ये ७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला राज्यातला मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २४ लाख १ हजार ६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १३ हजार ३८२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७७ हजार ५८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ५६ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज नोंद झालेल्या ७१ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर पाच मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button