breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

कृषी कायद्यावर राहुल गांधींनी चर्चेसाठी यावे; जावडेकरांचे खुले आव्हान

कृषी कायद्यावरून राजकीय आरोपप्रत्यारोप करण्यात येत आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. विरोधी पक्षांकडून देखील हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी दोनदा राष्ट्रपतींची भेट घेतली. यावरूनच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींना थेट कृषी कायद्यावर चर्चेसाठी जाहीर आवाहन दिले आहे.

राहुल गांधी कधी तरी लोकांसमोर येतात. ते नवे कृषी कायदे रद्द करा. कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की नाही यावर चर्चा करावी, असे खुले आव्हानच जावडेकर यांनी राहुल गांधींना दिले आहे. कृषी कायद्यावर चर्चेसाठी मी राहुल गांधी आणि डीएमकेला आव्हान देत आहे, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.

राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांची त्यांच्या राजकीय गुरुंकडून दिशाभूल केली जात आहे. जसे काही संपूर्ण देशातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत असं चित्र रंगवले जात आहे, असे जावडेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button