breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भर पावसात विद्युत बोर्ड उघड्या अवस्थेत; नागरिकांचा जीव धोक्यात
पिंपरी – महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. संत तुकारामनगर येथील गोल मंडईच्या मागील बाजूस विद्युत बोर्ड भर पावसात उघडा असल्याने नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे.
पिंपरीतील संत तुकारामनगर येथील गोल मंडईच्या बाजुला विद्युत पुरवठ्याचा बोर्ड उघड्या अवस्थेत आहे. याठिकाणी लहान मुले खेळण्यासाठी येतात. एखाद्याचा धक्का लागल्यास जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आज दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी जाऊन विद्युत प्रवाह जमिनीत उतरण्याची शक्यता आहे.
या बोर्डच्या संपर्कात आल्यास शॉक बसून जीव गमवण्याची वेळ एखाद्यावर येणार आहे. त्यामुळे वेळीच एमएसईबीने याबाबत सतर्कता बाळगण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.