राज्यभरात कोरोना संकटामुळे दहीहंडी उत्सव रद्द, सर्वत्र शुकशुकाट
मुंबई – दरवर्षी जन्माष्टमीनंतर मोठ्या धुमधडाक्यात दहीहंडीचा सोहळा साजरा होतो. मात्र यंदा कोरोना संकटामुळे दहीहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे आज मुंबई, ठाण्यासह राज्यभरात सर्वत्र ढोल-ताशांचा आवाज आणि उत्साह नसून शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
दहीहंडी साजरा करण्याची जुनी परंपरा महाराष्ट्रात आहे. ठाण्याला दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखले जाते. ठाण्याचा दहीहंडी उत्सव आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. परदेशी मंडळीदेखील शहरातील दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा येथील आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.
तर दुसरीकडे आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकारी आदेशाचे उल्लंघन न करता दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी गोविंदा पथकाने घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून दहीहंडी फोडून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.