राजस्थानातील बेपत्ता भारतीय पाकिस्तानातील तुरुंगात
जयपूर – राजस्थानमधील बुंडी जिल्ह्यातून 5 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली एक व्यक्ती पाकिस्तानातील तुरुंगात असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुगराज भील नावाचा रामपुरा गावातील रहिवासी गेल्या 5 वर्षांपासून बेपत्ता होता. त्याच्याबाबत चौकशी केली असता, तो पाकिस्तानमधील तुरुंगात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याचे कुटुंबिय राजस्थानमधील रामपुरिया गावात दाबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहात असल्याचे समजले आहे.
जुगराज हा बौद्धिक विकलांग असून तो पाकिस्तानात तो कसा पोहोचला हे कुटुंबियांनाही सांगता आलेले नाही. यामुळे तो पाकिस्तानी हद्दीमध्ये कसा गेला याबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जुगराज भीलच्या नागरिकत्वाबाबत खातरजमा करण्याची सूचनाही मिळाली असल्याचे बुंडी जिल्हा पोलिस अधिक्षक योगेश यादव यांनी सांगितले.
पंधरा दिवसांमध्ये उघड झालेली अशाप्रकारे ही दुसरी घटना आहे. जयपूरमधील गेल्या 36 वर्षांपासून बेपत्ता व्यक्ती पाकिस्तानमधील तुरुंगात असल्याचे गेल्या महिन्यामध्ये निष्पन्न झाले होते.