breaking-newsराष्ट्रिय

येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली : कर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. युडियुरप्पांचा शपथविधी रोखण्याची मागणी काँग्रेसने आपल्या याचिकेद्वारे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडे केली आहे. राज्यपालांचा निर्णय म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले, मला अमित शहांना विचारायचे आहे की, निवडणुकीनंतर जर दोन पक्ष एकत्र येऊ शकत नसतील तर आपण मणिपूर आणि गोव्यामध्ये सरकार कसे स्थापन केले. याप्रकारामुळे राज्यापालांनी आपल्या पदाला लाज आणली आहे. कर्नाटकच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात आम्ही कायदेशीर आणि संविधानिक अधिकारांचा वापर करुन जनतेच्या कोर्टात जाणार आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button