breaking-newsराष्ट्रिय

मोदी सरकारचा चीनला धडा शिकवण्यासाठी मास्टरप्लान

नवी दिल्ली : भारत-चीन सीमा वादावर मोदी सरकार लवकरच संपूर्ण देशात चिनी वस्तूंवर बंदी घालू शकते. केंद्र सरकारने ट्रेड चेंबर असलेले CII,FICCI,ASSOCHAM यांना ई-मेलच्या माध्यमातून चीन आणि इतर काही देशांकडून आयात होणाऱ्या वस्तूंची यादी मागवली आहे.

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून एक योजना तयार केली आहे. ज्यामध्ये अतिमहत्त्वाच्या नसलेल्या वस्तूंचं आयात रोखण्यासाठी टॅरिफ बॅरियर (ड्यूटी वाढवणं) आणि नॉन टॅरिफ बॅरियर लागू करुन आयात थांबवणं हा सरकारचा हेतू आहे.

सरकारने इतर देशांमधून आयात होणाऱ्या ३०० वस्तूंची यादी याआधीच तयार केली आहे. देशात या वस्तूंची आयात रोखण्यासाठी देखील योजना आखली जात आहे. असं म्हटलं जात आहे की, अत्यावश्यक वस्तू, औषधं आणि काही कच्चा माल सोडून इतर वस्तूंची आयात कमी केली जाईल.

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत, सरकार आता वस्तूंवर कंट्री ऑफ ऑरिजिन लिहिणं अनिवार्य करणार आहे. म्हणजेच वस्तू कुठे बनवण्यात आली आहे याची माहिती त्या वस्तूवर द्यावी लागणार आहे. सरकारच्या GeM पार्टलवर देखील काम सुरु आहे. ज्यामुळे ग्राहकांना याची माहिती मिळेल की ते कोणत्या देशात बनलेली वस्तू खरेदी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button