“मोदीजी एकाच्या बदल्यात 100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या पतीचे बलिदान व्यर्थ नको, सर्जिकल स्ट्राइक करा”- सैनिकाच्या पत्नीची व्यथा
पाटणा: चीनी सैन्यासोबत लडाखच्या गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले. शहीदांपैकी पाच जवान बिहारमधील होते. पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणाच्या बदल्यात 100-100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा” अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या आहेत.
बुधवारी संध्याकाळी शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव विशेष विमानाने पाटणा विमानतळावर आणण्यात आले. बिहटाच्या तारापूर गावात शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झाले होते. यावेळी दु:ख, राग आणि अभिमानाची भावना दिसली आहे. घराच्या अंगणात वीरपत्नी, वीरमाता, आणि अर्धांगवायूग्रस्त वीरपिता शहीद सुनील कुमार यांच्या पार्थिवाला कवटाळून तासनतास रडत राहिले आहे. अखेरच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला नागरिक हातात तिरंगा आणि फुले घेऊन उभे होते. ‘जय हिंद’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
Patna: Mortal remains of Havaldar Sunil Kumar who lost his life in the violent face-off with China in #GalwanValley, being taken for last rites in Bihta. #Bihar pic.twitter.com/RwQzgqLrJ1
— ANI (@ANI) June 18, 2020