breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

मुख्यमत्री ठाकरे यांच्या कामाची आम्ही तारीफ करत होतो, आता सगळे वाया गेले – जलील

औरंगाबाद | कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये थोडी सूट देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वॉईन्स शॉप सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर राज्यभरात दारुसाठी एकच गर्दी उसळ्याचे दिसून आले.

भल्ल्या मोठ्या रांगाच रांगा दिसून आल्यात. यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यानंतर रेड झोनमधील दुकाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दारु दुकाने सुरु करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आम्ही कौतुक करत होतो, पण आता सगळे वाया गेले आहे, असे जलील म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button