‘मिस्टर इंडिया’च्या कथेवर काम सुरु…
गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘मिस्टर इंडिया’च्या कथेवर काम सुरु असल्याची माहिती अली अब्बास जफार यांनी दिली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफार करणार आहेत.
अली यांनी ट्विटरवर याची माहिती चाहत्यांना दिली आहे. मिस्टर इंडिया हा भारताचा पहिल्या फळीचा सुपरहिरो आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अनिल कपूर यांनी मिस्टर इंडिया साकारला होता. हा चित्रपट तेव्हा सुपरडुपर हिट ठरला होता. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटाचा रिमेक येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर हा चित्रपटाच्या कथेवर काम सुरु असल्याचं सांगत जफार यांनी चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
चित्रपटाच्या कथेवर काम पूर्ण झाल्यानंतर कलाकारांची निवड करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. मात्र मनोरंजन विश्वात कतरिना या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे. पण तूर्त चित्रपटाच्या कास्टबद्दला माहिती उघड न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.