मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेमार्फत संविधानाला राखी बांधण्याचा उपक्रम
पिंपरी ( महा ई न्यूज)- संविधानाने आजपर्यंत लोकशाही व न्याय व्यवस्था टिकवली, असे संविधानच ख-यार्थाने आपले रक्षक आहे. त्यामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ओळख मिळाली, त्यांना जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे त्या संविधानाला वंदन करून त्याला आपले ख-यार्थाने रक्षक म्हणून बघण्याच्या दृष्टीकोन समोर ठेवून हा उपक्रम केल्याचे संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी सांगितले.
राखी पोर्णिमेच्या या दिवशी मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेकडून सर्वाचे रक्षण करणा-या संविधानाला राखी बांधण्याचा उपक्रम हाती घेवून संविधान वाचन करण्यात आले.
मानसाला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार देणाऱ्या व प्रत्येकाचे रक्षणासाठी वचनबद्ध व बंधुता शिकविणारे संविधानच बहीण भावाच्या नात्यासारखे रक्षक आहे. तसेच याच संविधानानेच आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिले, सर्व धार्मियांना एकत्र बांधून ठेवण्याचे कामही संविधानाने केले आहे. समाज एकसंध ठेवण्याचे काम रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून होत असते. असे पिंपरी चिंचव चे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी यावेळी सांगितले.
महिलांनी सर्व पदाधिकारी यांना “बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती”,या उक्ती प्रमाणे औक्षण करून राखी बाधल्या. यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृती महाराष्ट्र युवतीसेल अध्यक्षा शिवानी लालबिगे, संगिता जोगदंड, वसंत चकटे ,मुरलिधर दळवी, अँड सचिन काळे,आरविंद मांगले, गजाननत्र धाराशिवकर ऋतूजा जोगदंड, तृप्ती विसपूते यांनी सहभाग नोंदवला.