breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही; ते अंतर्विरोधाने पडेल : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे हे सरकार आम्ही पाडणार नाही. ते अंतर्विरोधाने पडेल. १२ आमदारांपेक्षा महाराष्ट्राची १२ कोटी जनता आमच्यासाठी महत्वाची आहे. कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार नव्या कपोलकल्पित कथा रचणे योग्य नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

सारथी संस्था आमच्या काळात स्थापन झाली, म्हणून ती खिळखिळी करण्याचा प्रकार योग्य नाही

राज्य सरकारला आमची जी काय मदत हवी असेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत

मराठा आरक्षण हा राजकारणाच्या पलीकडचा विषय. आम्ही जेव्हा आरक्षण दिले, तेव्हा सर्व पक्षांना विश्वासात घेतले. मोठी टीम तयार करून आम्ही काम करीत होतो. राज्य सरकारने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज

पोलिसांकडे आस्थापना मंडळ असते. ते मंडळ बदल्या ठरवीत असतात. समन्वयाचा अभाव तर आहेच. पण विश्वासाचा सुद्धा मोठा अभाव दिसतो आहे

सातत्याने सांगतो आहे, अजूनही खरी मृत्यूसंख्या पुढे आली नाही. मुंबईतील ४०० मृत्यू आणखी पुढे आलेले नाही

देशातील संसर्गापेक्षा महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाण फारच अधिक.

प्रति १० लाख लोकसंख्येमागे चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात नववा. कमी चाचण्या हेच महाराष्ट्रातील कोरोना वाढ होण्यामागील मुख्य कारण

रुग्ण व्यवस्थापन कमी पडते आहे. आरोग्य सेवकांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. ठाण्यातून २ ते ३ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे नातेवाईक मला आज भेटले

मृत्यूदर वाढणे हे अधिक चिंताजनक. महापालिकांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात मिळायला हवी. खाजगी रुग्णालयांकडून लूट थांबविणे आवश्यक. आयसीसीयू बेड कमी पडत आहेत

राज्यातील रुग्णसंख्येत मुंबई आणि एमएमआरमध्ये ७० टक्के रुग्ण तर मृत्यू सुद्धा याच भागात अधिक.

अशात चाचण्या वाढविण्याची गरज, त्याचे अहवाल लगेच आले पाहिजेत.

पनवेल, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर अशा सर्वच ठिकाणी संसर्ग प्रमाण अधिक आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button