महाराष्ट्रात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी; कोल्हापूर , सातारा , सांगली, सोलापूर, लातूर जिल्ह्यांसह राज्यभरात अतिवृष्टी
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर , सातारा , सांगली, सोलापूर, लातूर जिल्ह्यांसह राज्यभरात आज म्हणजे 14 ऑक्टोबरला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा द्यावा लागला आहे. मुसळधार पावसाचा तडाखा शेतीलाही बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जोरदार सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे. प्रामुख्याने कोल्हापूरमधील करवीर तालूक्यातील पश्चिम भाग आणि गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकामी घरांची पडझड झाली. पिके झोपली, तसेच नागरिकांच्या घरांचे पत्रेही उडाले. कोल्हापूर जिल्ह्यात येत्या शनिवार 17 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे अवाहन प्रशासनाने केले आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. सोलापूर मध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पिकांचेही मोठे नुससान झाले आहे.
एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसऱ्या बाजूला मुसळधार पावासामुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यतील बळीराजा सापडला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. परंतू, सतर्कतेमुळे होणारे नुकसान टळणार नाही. राज्य सरकारने शेतकऱ्याचे नुकसान विचारात घेऊन योग्यत ती मदत करावी अशी भावाना नागरिक व्यक्त करत आहेत.