breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

महाराष्ट्रात जरा काय घडलं की, राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत, अमोल कोल्हेंचा सवाल

पुणे |महाईन्यूज|

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणारे उत्तर प्रदेशातील घटनांच्या वेळी कुठे जातात, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. देशात लोकशाहीचा गळा घोटला जातोय, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना लोकशाहीवर घाला घालणारी असून उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याची टीका शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

एखाद्या कुटुंबांत दुदैवी घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समाज पुढे येत असतो. मात्र, उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेनंतर या ठिकाणी कुटुंबियांना भेटण्यापासून मज्जाव केला जातो. हि निंदनीय बाब असून नेहमी प्रत्येक गोष्टीवर बोलणारे भाजपाचे नेते यावेळी मूग गिळुन गप्प असल्याची कोपरखळी अमोल कोल्हेंनी भाजपला लगावली आहे.

पार्थ पवार यांच्या ट्वीट संदर्भात विचारले असता हे त्यांचे मत वैयक्तिक मत आहे. सगळ्यांना व्यक्तिस्वांतत्र्य आहे. पक्षनेतृत्वाने मत व्यक्त केल्यानंतर त्यावर मत व्यक्त करण गरजेचे नाही, असे औषधांची किमंत, रेमडेसिव्हीर, टेलीमेडीसीन, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अमोल कोल्हेंनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button