महापालिकेत अर्थपुर्ण वाटाघाटीनंतर बदलीस मिळतेय स्थगिती
- सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे यांची आयुक्तांकडे तक्रार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध विभागात वर्षांनूवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात महापालिका भांडार विभागातील कर्मचा-याच्या बदल्या झाल्या. परंतू, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी बदल्या झालेल्या कर्मचा-यांच्या बाजूने पत्र देवून भांडार विभागातून हलवू नये, प्रशासनला पत्र दिले. त्यावरून काहीच्या बदल्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या अर्थपुर्ण वाटाघाटीनंतर बदल्या रद्द झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे यांनी केला आहे.
यासंर्दभात महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाने विभागाने सहा वर्षे सलग सेवा पुर्ण झालेल्या किंवा वैद्यकीय कारणास्तव कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. पंधरा दिवसात बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र, अनेक कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी अद्याप रुजू झालेले नाहीत.
महापालिका भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रशासन विभागाला पत्र दिले आहे. भांडार विभागातून बदली झालेल्या कर्मचा-यांना हलवू नये, त्या विभागात सहा वर्षाहून अधिककाळ कर्मचारी ठाण मांडलेले आहेत. तरीही त्या कर्मचा-यांना हलविण्यास अधिका-याचा विरोधा आहे.
दरम्यान, प्रशासन विभागाने केलेल्या बदल्यामुळे अनेक कर्मचारी अधिकारी आमदार, नगरसेवक यांचे फोन अधिका-यांना येत आहेत. कर्मचारी बदलीस स्थगिती देण्याचा प्रस्ताव मांडण्याचा घाट घातलेला आहे. या प्रकरणी प्रशासन विभागात मोठ्या आर्थिक उलाढाल होत आहेत. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी रुजू न होणा-या कर्मचा-यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1971 मधील नियम 3(3) व 23 नूसार कारवाई करणेत यावी, अशी मागणी रेगडे यांनी केली आहे.