breaking-newsपिंपरी / चिंचवड

महात्मा जोतिबांचे विचार कायम स्मरणात ठेवू – काशिनाथ नखाते

फेरीवाला क्रांती महासंघाकडून महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे  चिंचवड येथील कार्यालयात महात्मा जोतिबा  फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी महात्मा फुले  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी लक्ष्मण सरवदे, जितेन्द्र साबले, अंजना गायकवाड़, नंदा साळुंके, सिंधु कदम, संजय शिंगे, लता सरावदे, गोपी राठोड, तारामती हाळनोर, विजया भोसले यांच्यासह कष्टकरी कामगार बांधव उपस्थित होते.

काशिनाथ नखाते म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांनी कष्टकरी, कामगार, शोषित, पिडित कामगारांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी लिहिलेल्या “गुलामगिरी” व “शेतकऱ्यांचा आसूड ” या ग्रंथातुन कष्टकरी व शेतक-र्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले, समाज सुधारण्यासाठी समग्र परिवर्तनाचा आधार शिक्षण आहे. शिक्षणाने माणूस बदलतो म्हणून सर्वाना शिक्षणाचा अधिकार मिळावा, याकरिता त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. आशा क्रांतीसुर्याना केवळ स्मृतिदिन आणि जयंती दिनी आठवण न करता त्यांच्या विचार कायम स्मरणात राहिले पाहिजेत. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही आवाहन नखाते यानी केले. याप्रसंगी प्रस्ताविक आणि आभार मधुकर वाघ यानी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button