breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

या निर्णयात शरद पवार सामील – खासदार नवनीत कौर राणा

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सभागृहामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित यायला हवं, असं म्हटलं होतं. आज भाजप आणि अजित पवारांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. या घडामोडीनंतर एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या की, राज्याच्या लोकांना कसा न्याय द्यायला पाहिजे हे पवारांनी नेहमी समोर ठेवलं आहे. काही बोलणी सुरू होती. त्यामुळेच मी हा ठामपणे हा विषय सभागृहात मांडला होता. गद्दारी भाजपने नाही तर शिवसेनेने केली आहे. मला वाटतं या निर्णयात शरद पवार सामील आहेत, असे राणा यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, ते त्यांनी करून दाखवले आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी नाही, तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सगळं समीकरण बिघडवलं असल्याचंही त्या म्हणाल्या. भविष्यात शिवसेना 100 टक्के फुटू शकते. याची सुरुवात भाजपने नाही तर शिवसेनेने केली असल्याचे देखील नवनीत राणा म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button