Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये; निलेश राणेंची संजय राऊतांवर आक्षेपार्ह टीका

मुंबई | महाईन्यूज

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सध्या देशातलं राजकारण ढवळून निघालेले आहे. जयभगवान गोयल यांनी लिहीलेल्या पुस्तकाला सध्या सर्व स्तरातून विरोध होत आहे. राज्यात सत्तेत मोठा भाऊ बनलेल्या शिवसेनेनेही या पुस्तकाला विरोध दर्शवलेला आहे. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना, महाराष्ट्रातली जनता बोलतेय, आता छत्रपती गादीच्या वारसदारांनीही बोललंच पाहीजे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी भाजपामधून राजीनामे द्यावे, अशी मागणी राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे, सातारचे आमदार शिवेंद्रराजे यांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदवलेला आहे. आता या वादात नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी उडी घेतलेली आहे. मराठ्यांनी काय करावं हे पवारांच्या कुत्र्याने सांगू नये अशा शब्दांत, निलेश राणेंनी राऊतांवर टीका केलेली आहे.ज्यावेळी मराठ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यावेळी राऊतांनी आगीत तेल ओतायचं काम केलेलं आहे. यांना मराठ्यांमध्ये भानगडी लावायच्या आहेत अशा शब्दांत निलेश राणेंनी राऊतांना आपल्या टीकेचं लक्ष्य बनवलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून राऊतांच्या या टीकेला काय उत्तर मिळतं हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button